अर्थहीन सुरावटींना पाय फुटले,
रूणझुणत भिंगोरल्या त्या
याच्या कानावर,
त्याच्या बोटांमधे
आडवळणाची लय त्यांची
घुमघुमत उगवत गेली
तुझ्या गाभ्यावर
माझ्या मनावर
मनावर लयीचे लाखो धुमारे
सरसरत पेटत राह्यले
ह्या देहावर
त्या वळणावर
देहाची वळणे पाकळी पाकळी
रिमझिम कोरत गेली
इथल्या हवेवर
या घटीकेवर
जिथे तिथे बहरलेल्या सुरावटी
मंद मंद झुळकत बसल्या
या खेळावर
या अर्थावर
कविता म्हणजे खरं बोलणं. कविता म्हणजे प्रामाणिक असणं. बास इतकंच आहे या प्रवाहिकांमधे...!
11:47 AM
Subscribe to:
Post Comments (Atom)


0 comments:
Post a Comment